दहावी-बारावीच्या परिक्षा लेखी पध्दतीनेच होणार-वर्षा गायकवाड
सुरक्षेसंदर्भात विशेष उपाययोजना तसेच पुरवणी परिक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
आतपर्यंत दहावीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परिक्षा घेतल्या जात असत परंतू कोविड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे विशिष्ट लेखन कार्य म्हणजेच गृहपाठ (Assignment) घेण्यात येणार असुन दहावीच्या व बारावीच्या परिक्षा ह्या लेखी पध्दतीने होतील असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
प्रात्यक्षिक परिक्षेऐवजी विशिष्ट लेखनकार्य,गृहपाठ पध्दतीने २१/०५/२०२१ ते १०/०६/२०२१ या कालावधीत सादर करण्यात यावेत तसेच बारावीच्या लेखी परिक्षेननतर लगेच म्हणजे २२/०५/२०२१ ते १०/०६/२०२१ याच कालावधीत होतील असेही त्या म्हणाल्या पुढे बोलताना कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्याची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकांवरच परिक्षा घेण्यात येतील व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्र्यपणे देण्यात येईल आणि कला, वाणिज्य,व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यानी लेखी परिक्षेनंतर १५ दिवसात गृहपाठ सादर करावेत तसेच इ.१० वी व १२ वी मधिल विद्यार्थ्यास अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परिक्षेवेळी कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन,कन्टेंमेंट झोन, संचारबंदी अथवा कोरोनाविषयक परिस्थितीमुळे प्रात्यक्षिक परिक्षा अथवा गृहपाठ सादर करण्यासाठी १५ दिवसाचा अधिकचा कालावधी देण्यात येईलअशी माहिती यावेळी वर्षा गायकवाड यांनी दीली आहे.
लेखी परीक्षा
इ. १० वी ची लेखी परीक्षा २९/०४/२०२१ ते २०/०५/२०२१ या कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे. इ. १२ वी ची परीक्षा दि.२३/०४/२०२१ ते २१/०५/२०२१ कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल.
परीक्षा केंद्रे
कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल. परीक्षेची वेळ दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परिक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घडयाळी तासा साठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.
विशेष परीक्षेचे आयोजन
एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.
पुरवणी परीक्षा
परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.
सुरक्षात्मक उपाय योजना
परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील कोविड-१९ बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील . सर्व विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.